Wednesday, August 26, 2020
Sunday, August 23, 2020
बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.
राजूर:-अकोले तालुक्यातील हरीचंद्र गडाच्या पर्वत रांगांत आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले शेवंतीचे मळे कोरोनामुळे कोमेजून गेले आहेत.फुलांची बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.
bapu
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून वश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे मनात उर्मी असणारे शांताराम बापू काळे व त्यांच्या सुविध्य पत्नी प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांचा आज लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक , अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ५० कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात . कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे . तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वाहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत बापूना गेली २८ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने लग्न वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ... त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... सोमनाथ बनसोडे सर
ReplyForward |
Friday, August 21, 2020
भाताच्या शेताची लावनी....
भाताच्या शेताची लावनी....
ReplyForward |
Wednesday, August 19, 2020
RAGHOJI BHANGARE
नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाई डोंगररांग आहे. या डोंगररांगेत वसलेल्या दुर्गापैकी रतनगड हा घनचक्कर रांगेत प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला एक दुर्ग. प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर आहे. रतनगडाच्या उजवीकडे असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन सांदण दरीसाठी प्रसिध्द असलेले साम्रद गाव देखील गडाच्या घेऱ्यातच आहे. इगतपूरी-घोटी–शेंडी-रतनवाडी किंवा साम्रद हे अंतर साधारणपणे ७० कि.मी. आहे. भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील शेंडी गावातुन एक फाटा साम्रदकडे तर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो. रतनवाडी आणि साम्रद या दोनही गावातुन रतनगडावर जाता येते. रतनगडाची समुद्रसपाटीपासुन उंची साधारण ३५०० फुट आहे. रतनगड व आसपासचा परीसर संपुर्ण फिरायचा असल्यास रतनवाडी गावातुन चढुन साम्रद गावात उतरावे किंवा साम्रद गावातुन चढण्यास सुरवात करावी व रतनवाडीत उतरावे. साम्रद गावातुन जाताना पाणी भरुन वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे कारण वाटेत कोठेही पाणी नाही. गडावर जायची वाट जंगलातून जात असली तरी काही ठिकाणची खडी चढण मात्र दमवते. या वाटेने जाताना डावीकडे खोल दरीतील बाणचा सुळका आपले लक्ष वेधून घेतो. या वाटेने चढताना आपल्याला दोन छोटया शिड्या लागतात. दुसऱ्या शिडीने वर चढले की डावीकडची वाट रतनवाडीकडे तर उजवी वाट रतनगडावर जाते. साम्रदमधून आपण साधारण दीड ते दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्या व कातळात कोरलेल्या त्र्यंबक दरवाजाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशद्वारातच पहारेकऱ्याच्या दगडात कोरलेल्या देवडय़ा आहेत. दरवाजातुन वर आल्यावर येथुन अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा परिसर दिसतो. या माचीवर उध्वस्त मंदिर असुन घराचे काही अवशेष आढळतात. येथुन वर गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत सहा-सात माणसे सहज बसु शकतील असे निसर्गनिर्मीत नेढे आढळते. या नेढ्यातून चहुबाजुंचा परिसर दिसतो. नेढ्याच्या दुसऱ्या बाजुस खालच्या अंगाला पाण्याचे एक टाके असुन थोडे पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. येथून पुढे गेल्यावर सहासात टाक्यांची रांग आढळते. या टाक्यावर एका ठिकाणी शिवलिंग कोरलेले आहे. याच्या पुढे आपल्याला एक वेगळीच रचना दिसून येते. येथे जमिनीला समांतर असे एक टाके असुन या टाक्याच्या आत शिरण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आत दगडात कोरलेल्या दोन मोठया खोल्या आहेत. यातील एक खोली अर्धवट खोदलेली असुन दुसरी खोली २०x३० आकाराची आहे पण या खोलीत पाणी साठलेले आहे. या टाक्याच्या दुस्त्या बाजुस चर खोदलेला असुन चराच्या सुरवातीच्या तोंडास दरवाज्यासारखे बांधकाम आहे. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. येथुन साधारणत: ५ मिनिटे चालल्यावर उजवीकडील बाजुस उध्वस्त स्थितीत कोकण दरवाजा लागतो. येथुन खाली उतरणारी वाट मात्र वापरात नसल्याने धोकादायक आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर आपण गडाच्या रतनवाडीकडील भागात येतो. या भागात गडावरील सर्वाधिक अवशेष आहेत. येथे वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष असुन जवळच एक सुटा टेहळणीचा भग्नावस्थेतील मनोऱ्यासारखा गोल बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. तो कुठल्याही तटाला लागुन नसल्याने बहुधा गडाच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी याची रचना असावी. या बुरुजाला लागुन पाण्याचे एक टाके असुन पुढील बाजुस पाण्याची अजुन तीन मोठी टाकी आहेत. यात पिण्यायोग्य पाण्याचे एक टाके आहे. इथे एका टाक्यात नंदी आणि शिवलींग पहायला मिळते. या भागातील गडाची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. डावीकडची वाट आपल्याला गडाच्या दुसऱ्या प्रवेशदाराकडे नेते. या दरवाज्यावर मत्स्यावतारातील विष्णू, गणेश-रिद्धी-सिद्धी आणि हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाच्या समोर डाव्या बाजूस कडय़ात कोरलेल्या दोन प्रशस्त गुहा आहेत. यात २० ते २५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. यातील एका गुहेत गडाची देवता रत्नादेवीचा तांदळा आहे. इथे जवळच पाण्याचे टाकेही असल्याने इथुनच प्रवरा नदीचा उगम झाल्याचे म्हटले जाते. समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि घनचक्करचे पठार दिसते. गुहेच्या खालील बाजुस गणेशाचे शिल्प कोरलेला गणेश दरवाजा आहे. रतनवाडीत जाण्यासाठी या गणेश दरवाजातुन खाली उतरावे लागते. वाटेमध्ये असलेला २५ ते ३० फुटाचा कातळकडा पार करण्यासाठी दोन ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत. येथेच पुर्वीच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या खुणा दिसुन येतात. ब्रिटिशांनी १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे या गडावरसुद्धा तोफा डागून वर जाण्याचे सगळे मार्ग बंद केले होते. त्याच्यानंतर अगदी निमुळत्या दगडात खोदलेल्या पायऱ्या पुढे थोडी सपाटी व नंतर काही पायऱ्या असा प्रवास करुन आपण खाली उतरतो. खाली वाटेत एका ठिकाणी कात्राबाई-हरिश्चंद्रकडे जाणारा पुर्वीचा राजमार्ग असुन येथे एक दगडी चौथरा बांधला आहे. पुर्वी येथे मोठया प्रमाणावर वस्ती असावी कारण कारण या जंगलात घरांचे अवशेष मोठया प्रमाणात आढळून येतात शिवाय येथे पाण्याची दगडात बांधलेली दोन मोठी टाकी आहेत. हि टाकी आजही भरलेली जवळचे पाणी संपले असल्यास येथील पाणी भरून घेण्यास हरकत नाही. साम्रत गावातुन निघुन रतनगड फिरून येथे येण्यास पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. येथुन पुढे पायवाटेने घनदाट जंगलातून आपण दीड तासात आपण रतनवाडीत पोहोचतो. या वाटेने जाताना प्रवरा नदीचे पात्र आपल्या बरोबरच वाहत असते. रतनवाडीत अमृतेश्वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. साधारण १० व्या ११व्या शतकात झांज राजांनी १२ नद्यांच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले असुन मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे ही रचना वैशिष्ठपुर्ण आहे. मंदिराच्या दरवाज्यावर व छतावर यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या शेजारी विष्णुतीर्थ नावाची प्रशस्त अशी पुष्करणी आहे. यात अनेक कोनाडे असुन विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मुर्त्या आहेत. पेशवेकाळात या मंदिराचा उल्लेख आढळतो तो असा:-श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली. येथून साम्रद गाव साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी.वर आहे. सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यायलाच हवी. गडाच्या इतिहासात डोकावले असता थेट पुराणापर्यंत संदर्भ मिळतात. पुराणात असा उल्लेख आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. त्यात राहु नावाचा एक दानव शिरला व त्याने अमृत प्राशन केले हे पाहुन विष्णुने त्या दानवाचा शिरच्चछेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या धारेचे नदीमध्ये रुपांतर झाले व या नदीस अमृतवाहीनी असे नाव पडले. परंतु शिवकाळात या गडाची फारशी माहिती मिळत नाही. १७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. नानासाहेब पेशव्याच्या काळात रतनवाडीच्या मंदिरासाठी काही रक्कम दिल्याचे कळते. त्यावेळी बाळाजी कारळेने हा किल्ला घेतला होता. रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे १८१८ सालापर्यंत रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. यात सह्याद्रीच्या वरची राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुस्त्रोशि परगण्याची ६० खेडी होती. इ.स.१८२० मधे इंग्रज कॅप्टन गोड्डार्डने हा किल्ला घेतला पण नंतर आधीचा किल्लेदार गोविंदराव ह्याने १८२४ साली किल्ला परत हस्तगत केला. त्याला रामजी भांगरे याचा पाठिंबा होता. हा प्रतिकार फार वेळ टिकला नाही व रतनगड पुन्हा इंग्रजांकडे गेला. इथे परत ह्या प्रकारचे उठाव होऊ नयेत यासाठी इंग्रजांनी वरती जाणाऱ्या कातळवाटा सुरुंगाने उडवल्या. १७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, व ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांना कडवा संघर्ष करून सळोपळो केले. अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला. रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटींविरोधात आवाज उठविला. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींटोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. अखेरीस कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३०मध्ये फाशी दिले. रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपल्या कुटुंबासह देवगावला रहात होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केल्याने तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले. १८४५च्या चकमकीत राघोजीचे गुरु देवजी महार ठार झाल्याने तो खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडीत वारकरी म्हणुन सहभागी केले. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा असुन दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते. -------------------सुरेश निंबाळकर
|
Tuesday, August 4, 2020
माणसातील देव मला भेटले
माणसातील देव मला भेटले-चिमणी आपले घरटे तयार करते पण तिचे घरटेही काही जण पडण्याचा प्रयत्न करतात मात्र गरूडरूपी पक्षी तिचे ते घरटे वाचवतो तसेच काहीसे माझ्याबाबतही घडले समाजविघातक मंडळींनी एकत्र येत एक लाचखोर पोलिसाला हाताशी धरून माझे चिमुरड्या मुलांचे ज्ञानरुपी घरटे उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ,माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझी लेखणी हिसकावून घेतली त्यात ते काही अंशी यशस्वी झालेही असतील मात्र समाजात अजूनही काही देव माणसे असल्याने मी त्यातून सावरलो तर सकाळचे कार्यकारी संपादक ऍड बाळासाहेब बोठे पाटील हे माझ्यामागे खंबीर पणे उभे राहिले माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला मला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळाली ,माझ्या आयुष्यात ऍड,बाळासाहेब बोठे साहेब प्राचार्य प्रकाश टाकळकर सर,ऍड नितीन जोर्वेकर ,यांनी मला अडचणीच्या काळात साथ केली ,ही देव माणसे माझ्या आईवडील इतकेच माझ्या जन्मोजन्मी हृदयात आहेत व यापुढेही राहतील असे भावनिक मत शांताराम काळे यांनी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला व्यक्त केले सुमारे दोन तपाच्या पत्रकारीते नंतर गत वर्षी जानेवारी महिन्यात अकोले तालुका प्रतिनिधी म्हणून सकाळमध्ये दाखल झालो आणि पत्रकारितेचे एक वेगळेच विश्व माझ्यासाठी खुले झाले सकाळच्या संपादकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतानाच सकाळच्या सामर्थ्याची प्रचीती येऊ लागली विविध प्रकारच्या प्रश्नांना विशेषता उपेक्षित वंचित माणसां संदर्भातील बातम्यांना सकाळमध्ये मिळणारे स्थान त्याचा समाजमनावर होणारा परिणाम या बाबी लक्ष्यात आल्या आमचा अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम डोंगराळ इथल्या माणसांचा जीवनसंघर्ष त्यांचे दु:ख , व्यथा , वेदना मांडण्याची त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची संधी सकाळ मुळे मिळाली माझ्या दीड वर्षातील काळातच मनात घर करून राहतील असेही ते म्हणाले
अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास असल्याने त्यांच्याच नावाने 1992 साली
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.संस्था स्थापनेसाठी कै.राघवराव पवार,कै.रमेश आरोटे,मिलिंद उमराणी, जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,एम.के.बारेकर,नंदकुमार बेल्हेकर,सुमंत वैद्य,हबीब मणियार,शशिकांत ओहरा,देविदास शेलार,श्रीराम पन्हाळे ,चंद्रकांत बांगर यांनी बहुमोल मदत केली.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. संस्था पदाधिकारी ,ग्रामस्थ व पालक यांची खंबीर साथ असल्याने ज्ञानदानाचा हा यज्ञ अविरतपणे चालु राहिला. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेऊन विविध अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान महिला यांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक प्रेरणा भरण्याचे काम अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो.
सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा सत्कार्याचा वसा पुढच्या पिढीला समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे.
कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम.
तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे.
नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा हक्काचा माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.
काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..!
म्हणूनच आपणास
वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा
आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने
अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...
-
अकोले , ता.५: घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन आज भंडारदरा परिसरात पाहायला मिळाला [ Chameleon ] हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जी...