Sunday, August 23, 2020

बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.

 राजूर:-अकोले तालुक्यातील हरीचंद्र गडाच्या पर्वत रांगांत आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले शेवंतीचे मळे कोरोनामुळे कोमेजून गेले आहेत.फुलांची बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.

     आजोबा पर्वतात उगम पावलेल्या मुळेचे पाणी छोटे मोठे पाझर तलाव व कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून तालुक्यात अडविण्यात आले.या खोऱ्यात मुळा बारमाही होऊ लागली आणि कुठे वीजपंप तर कुठे डिझेल इंजिनाच्या साहायाने हे पाणी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत खेळू लागले.जिरायत नंतर काय या प्रश्नाला उत्तर मिळाले आणि या परिसरातील शेतकरी आपल्या शेतांत भाजीपाला घेऊ लागला.
    प्रवरा खोऱ्यातील सधन शेतकऱ्यांचे अनुकरण करत आदिवासी शेतकरी भात पिकाची कापणी केल्यानंतर त्यात रब्बी आणि नगदी पिकांच्या जोडीला शेवंती आणि झेंडू या फुलांची शेती करू लागला.
    लावलेली ही फुलझाडे ऐन लग्न सराईत बहारायची त्यामुळे या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी होत असे .फुलशेती परवडण्यासारखी असल्याने वांजुळशेत,खडकी,लव्हाळी या परिसरातील अनेक शेतकरी  शेतात प्रामुख्याने शेवंतीची लागवड करत आहे.याच भागातील भाजीपाला वाहतूक करणारे ही फुले कल्याण मार्केटला नेत असत.
    यावर्षीही याच पट्ट्यात अनेकांनी शेवंतीच्या फुलांची लागवड केली होती.फुलांचे पीकही जोमाने आले.फुले निघण्याचीवेळ आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि फुलांची बाजारपेठ बंद झाली.स्थानिक फुल माळ्यांचीही दुकाने बंद झाली. त्यामुळे  एकही तोडा  न करता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेले या फुलांचे मळे सोडून दिले आहेत.
    चौकट:-प्रवरेच्या पट्ट्यात अनेक शेतकरी काही वर्षयंपासून फुलशेती करत आहे.लागवडी पासून तर फुले तोडण्यासाठी आमच्याच परिसरातील लोक रो�
Attachments area

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...