Tuesday, November 14, 2023

वैभव २०२४

2024 ची आशा-
वैभवराव पिचड ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे अपेक्षेने पाहू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत. लोकांना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.विविध प्रकारे लोक पिचड पिता पुत्रांबद्दलची आपली भावना उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका घेणाऱ्या माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका सहजतेने पार पाडणारे असे राजकीय नेतृत्व तसे दुर्मिळच म्हणावे लागेल . विधानसभा निवडणुकीत वैभवराव पिचड याना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले .पण या पराभवाने ते खचले नाहीत .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून दिसली ती जनहिताची तळमळ,आता राज्यातील सत्ता बदलानंतर त्यांची भूमिका बदलली आहे. 2019 नंतर त्यांचे अनेक जेष्ठ सहकारी त्यांना सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही ते ठाम पणे उभे होते .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले .त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचेवर नाराज असणारी तरुणाई पुन्हा त्याच्या जवळ येऊ लागली आहे .गावोगाव त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होतांना दिसत आहे. नम्र स्वभाव,अंगी सुसंस्कृतपणा, मात्र अन्यायाविरुद्ध लढा देणारा म्हणून त्यांनी आपली ओळख संपूर्ण तालुक्यालाच नव्हे तर राज्याला करून दिली. प्रत्येक गावातील त्यांचा संपर्क व संवाद हा सध्या त्यांचा उत्साह वाढविणारा दिसत आहे.त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहाने सक्रिय झालेले दिसत आहे. मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात ते एकटे पडले,पण खचले नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत त्यांना फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता आणून टायगर अभि जिंदा है हे दाखवून दिले. अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा त्यांनी एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी ते कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते पण यावेळी त्यांनी त्यात आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा त्यांना निश्चितच लाभ होणार आहे.महानंदा च्या संचालक पदावरही त्यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली.त्यांच्या विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे माजी आमदार पिचड यांनी मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.त्यांच्या या धडपडी मुळे जनतेमध्ये त्यांचे बद्दल ची आपुलकी वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यांच्या संघर्षाची व आदिवासी समाजासाठी असलेली तळमळ पाहून भाजप पक्षनेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळणारे पिचड हे एकमेव अपवाद असतील.त्यांच्या वर एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र पिचड यांनी भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी त्यांनी नम्रपणे नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली.त्यांनी आपली निवड सार्थ ठरविली आहे. तालुक्यातील राजकीय घडामोडी त्यांना त्रासदायक ठरतात की,अशी शंका सर्व सामान्य जनतेच्या मनात येत होती.मात्र ज्यांनी साथ सोडली ते पाहून वैभवराव पिचड यांनी सर्व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना धीर दिला.मी खंबीर आहे.असा विश्वास दिला. व पहाता पहाता तरुणाई ने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि गावोगावचे युवक, महिला यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आम्हीं तुमच्या बरोबर आहोत असा पाठींबा दिला.तालुक्यात भाजप पक्ष रुजनार नाही अशी चर्चा होत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसायला लागले.जे सोडून गेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन युवक एकत्र आले. आणि गावागावात भाजपच्या शाखा सुरू व्हायला लागल्या.नवीन जोश भाजप कार्यकर्त्यांनी आणला. त्यांचे नेत्तुत्व मान्य करीत असल्याचे वातावरण तालुक्यातील जनता पाहू लागली.विरोधकावर टीका करताना कधी पातळी सोडून बोलले नाही.मोठ्यांना सन्मानाने वागणूक देणे ही त्यांना त्यांच्या आई वडिला कडून मिळालेली शिकवण जनतेला दिसू लागली. सर्व कार्यकर्त्यांना मानाने वागणूक देणारे नेत्तुत्व त्यांच्या रूपाने तरुणांना आकर्षित करू लागल्याचे चित्र दिसत आहे.40 वर्षे काय विकास केला ही जनता विसरली नाही मात्र विरोधी नेते जाणून बुजून राजकारण करत आहेत. हे आता जनतेला हळुहळू कळायला लागले. हे मात्र नक्की, व पुन्हा एकदा तालुक्यात पिचड यांच्या रूपाने आमदार म्हनुन जनता त्यांना विजयश्री मिळवून देईल व पुन्हा नव्या उत्साहात विकास कामासाठी तालुक्यात 'वैभवपर्व' सुरू होईल असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व पिचड समर्थक व्यक्त करत आहेत. अमृतसागर दूध संघ निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविली त्यांच्या पारदर्शी व काटकसरी च्या कारभाराला दूध उत्पादकांनी स्वीकारले.मागील 7 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दरवर्षी त्यांनी दूध उत्पादकांना सर्वाधिक रिबेट दिला. कोरोना काळात तसेच लंपी आजाराच्या साथीच्या काळात दूध उत्पादकांना आधार देण्याचे काम त्यांचे मार्गदर्शनाखाली दूध संघाने केले.कर्जबाजारी अससेला दूध संघ कर्जमुक्त करीत उर्जितावस्थेत आणला. दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य सिद्धा केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती,विकास सोसायटी वैभवराव पिचड नेतृत्वाखाली ताब्यात आल्या आहेत.भविष्यात होणाऱ्या जि प ,पं स,बाजार समिती, खरेदी विक्री संघ यात योग्य माणसांना संधी देऊन या संस्थाही भाजप ताब्यात घेण्याचे त्यांनी नियोजन केलेले दिसुन येते. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही क्षेत्रात निर्णय घेतांना ते सर्वांगीण अभ्यास करतात. त्यांच्या या अभ्यासपूर्ण गुणांमुळे लहान सहान बाबही त्यांच्या नजरेतून सुटत नाही.त्यांचे हे वैशिष्ट्य अनेक बैठकांमध्ये दिसून येते. त्यांच्या अभ्यासपूर्ण वृत्ती मुळे तसेच पारदर्शी व्यक्तिमत्वा मुळे सध्याच्या शिंदे -फडणवीस सरकार मध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे,त्यांनी सांगितलेले कोणतेही काम मार्गी लागत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांच्यावर विशेष वरदहस्त आहे.त्यामुळेच माजी आमदार हा शब्द विसरून जनता आता त्यांच्या कडे आमदार म्हणूनच पहात आहे. हीच बाब त्यांना 2024 मध्ये पुन्हा एकदा आमदार करणार आहे.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...