ग्रामीण भागातील
चुलीचा धूर कमी करण्यासाठी गॅस सबसीडी सारखे विविध उपक्रम केंद्र सरकारकडून सुरु
आहेत. मात्र,
सध्याच्या
वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी तसेच, पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणाऱ्या इंधनची पुर्वतयारी म्हणून मावळातील ग्रामीण
भागात आजही मोठ्या प्रमाणावर शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. गॅस इंधनाला पर्याय म्हणून शेणाच्या गोवऱ्या
तयार केल्या जातात. उन्हाळा सुरु होताच मावळ आणि परिसरात गोवऱ्या थापण्याची लगबग
सुरु आहे.
गोवऱ्यांची साठवणूक व्यवस्थित करण्यासाठी पवनमावळ भागात कलवड लावण्यास सुरुवात झाली आहे. तर, काहींचे कलवड लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी गॅसचा वापर कमी करावा लागतो. तसेच, त्यासाठी हा चांगला उपाय असल्याने वर्षानुवर्षे शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्याची खास काळजी घेण्यात येते. तीव्र उन्हामध्ये ती वाळवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील लागणाऱ्या इंधनाच्या तयारीसाठी शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या चोरीला जावु नये आणि पावसाळ्यात भिजु नयेत यासाठी गोवऱ्या कलवड स्वरुपात ठेवल्या जातात.
गोवऱ्यांची साठवणूक व्यवस्थित करण्यासाठी पवनमावळ भागात कलवड लावण्यास सुरुवात झाली आहे. तर, काहींचे कलवड लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी गॅसचा वापर कमी करावा लागतो. तसेच, त्यासाठी हा चांगला उपाय असल्याने वर्षानुवर्षे शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्याची खास काळजी घेण्यात येते. तीव्र उन्हामध्ये ती वाळवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील लागणाऱ्या इंधनाच्या तयारीसाठी शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या चोरीला जावु नये आणि पावसाळ्यात भिजु नयेत यासाठी गोवऱ्या कलवड स्वरुपात ठेवल्या जातात.
चौकट- आदिवासी
समाजाचा पावसाळ्यातील मुख्य आधार कलवड असून तिच्या साठी आदिवासी महिला खूप मेहनत
घेत असतात. पावसाचा कितीही जोर असला तरी या कलवडीमुळे गोवऱ्याचे रक्षण होते.विशेष
टेक्निक वापरून गोवऱ्यासाठी आच्छादन केलेली कलवड ही ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या परिश्रमाचे यशच मानले पाहिजे.
जितीन साठे,विभागीय अधिकारी,बायफ, नाशिक
No comments:
Post a Comment