Saturday, May 16, 2020

पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.

अकोल्यापासून चे अंतर : 47.2 km.
पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.

“विश्रामगड” सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्र्यांयची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.
इतिहास :
पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्र्यांाचा उपयोग होत असे. शिवरार्यांवनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण ’विश्रामगड’ असे केले. जालान्याची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे र्यां चे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्र्यांनना जिंकून घ्यावा लागला.
पहाण्याची ठिकाणे :
पट्टावाडीतून पायर्यांच्या वाटेने वर आल्यावर दोन गुहा लागतात.यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. दुसर्याध गुहेत राहाता येते. या गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत, पण वापरात नसल्याने त्र्यांधची अवस्था वाईट आहे. या गुहां जवळून जाणार्याक पायर्यां च्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी – हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. मधे तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्यां चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते. प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्याज लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिरा समोरून उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला “अंबरखाना” म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. येथून वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला ( औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे काही गुहा लागतात. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची टाकी लागतात, त्र्यांाना “बारा टाकी” म्हणून ओळखतात. येथून सरळ जाणार्याक वाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. बारा टाकी पासून परत फिरुन परत येतांना थोडे खालच्या बाजूस उतरून आल्यास अजून काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
इतिहास :
पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुल पुन्हा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्या. चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्याा वाटेने आपल्याला परत सुरुवातीला पाहिलेल्या गुहेपाशी जाता येते. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात.------------नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड,  हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गाची मालिकाच आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. या सगळ्या किल्ल्यांतील पट्टा ऊर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.  महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभलेय, तसेच ते अकोले तालुक्याच्याही वाटयाला आलेय. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्री पर्वताची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. त्यात नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गाची मालिकाच आपल्याला भेटते.
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. या सगळ्या किल्ल्यांतील पट्टा ऊर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय.  महाराजांच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.
नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आजही हा गड ताठ मानेने मोठया दिमाखात उभा आहे. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे.
या किल्ल्याची भौगोलिक रचना वैशिष्टय़पूर्ण अशीच आहे. एरियल व्ह्यूने पाहिल्यास या किल्ल्याचा आकार आकाशातील पंख पसरलेल्या गरुडाप्रमाणे दिसतो! पट्टा किल्ला एका अर्थाने हिंदवी स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्दच होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एक हजार ३९२ मीटर (४५६६ फूट) इतकी आहे. इतिहास काळातल्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यास फार मोठा इतिहास या गडाला असल्याचे कुठेही सापडत नाही. पण गडाचे तालेवार सोबती पाहता, तेथील भग्नावशेष पाहता या गडाचा उपयोग इतिहासकाळात नक्की झाला असेल, याची खात्री पटते.
एकेकाळी शत्रू सन्यावर आग ओकणारी बुलंद तोफ. आज मात्र गडाच्या पायथ्याशी निद्रिस्त अवस्थेत आहे. पूर्वेकडून चढाई करत वर गेले की, पहिल्या टप्प्यात एका सरळसोट कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. गडावर जाताना एका गुहेत थोर तपस्वी लक्ष्मण महाराजांची समाधी लागते. दुस-या गुंफेत काळ्या कातळातून पाझरलेले थंडगार पाणी आहे. आणखीन थोडे चढून वर गेले की, उत्तराभिमुखी त्र्यंबक दरवाजा येतो. त्याचे बांधकाम इतके भक्कम आहे, त्यामुळे आजही तो एकदम सुस्थितीत आहे.
किल्ल्याच्या पठाराकडे जाताना मध्येच एक देवीचे मंदिर लागते. भगवती देवीच्या मंदिराचे सध्या बांधकाम सुरू आहे. या मंदिराभोवती पुन्हा पाण्याची टाकी आहेत, ती कातळात कोरलेली आहेत. बहुदा ही यादवकालीन असावीत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गडावर अष्टभुजा ऊर्फ भगवती या देवीची यात्रा भरते. परिसरातील आदिवासी भाविक मोठया संख्येने गडावर येतात.
एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या घटका मोजतोय. पावसाळ्यात गाई-गुरांना निवारा म्हणून गुराखी या राजवाडयाचा वापर करतात. किरकोळ डागडुजी केल्यास हा महाल पुन्हा दिमाखाने उभा राहील. याखेरीज ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावरून निसटण्यासाठी येथे चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा म्हणजे शिवकाळातील स्थापत्य विशेषाचा एक आदर्श असा नमुनाच. गडावर तब्बल ३० पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.
पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात तिकडे तरहेतरहेची रानफुलं फुलतात. अनेक औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. वर पोहोचल्यावर गडावरून पाहिले की, सभोवार चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. लांबवर पश्चिमेस कळसूबाई, अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्गत्रिकुट खुणावत राहते. दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा जणू आपल्याला हात हालवताहेत. इगतपुरी म्हणजे महाराष्ट्रातील धरणांचा तालुका. विश्रामगडावरच्या पश्चिम टोकाला उभे राहून पाहिले की विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयांचे विहंगम दृश्य डोळ्यांना सुखावते. या गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे अकोल्यातल्या इतर गडांपेक्षा विश्रामगड जास्त भाग्यवान म्हटला पाहिजे. कारण शिवस्पर्श झाल्याने ही भूमी पावन झालीये. सन १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज पुढे चालले होते. नाणेघाटमाग्रे कल्याणवरून रायगड असे जाण्याचे नियोजन होते.
दरम्यान, महाराज सोने-नाणे अशी लूट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर पिसाळलेला मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळ दोन्ही सन्यांची गाठ पडली. दिनांक १८, १९ आणि २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सन्यांत तुंबळ युद्ध झाले. संघोजी निंबाळकर खानाबरोबर भिडला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. अखेर तो धारातीर्थी पडला. महाराजांबरोबर असलेल्या साडेआठ हजार सन्यापैकी चार हजार सन्य कामी आले. शत्रू सन्याने महाराजांना घेरले होते. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येऊन धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे व्हायचे, बाकीच्या सन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली.
राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज मध्यरात्री संगमनेरहून पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. दाट जंगल आणि िहस्र् श्वापदे यांचा वावर. रामायण काळातले दंडकारण्य म्हणतात तो हाच परिसर. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करीत महाराज गडावर सुखरूप पोहोचले. अर्थातच यात बहिर्जीचा मोठा वाटा होता.
संगमनेरजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. जवळपास १७ दिवस त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्येत खालावली होती. येथील थंडगार, शुद्ध हवा आणि जीवाला जीव देणा-या आदिवासी महादेव कोळ्यांच्या कडेकोट पहा-यात थकलेल्या राजांना विश्रांती मिळाली. पुढे राजे कल्याणमाग्रे रायगडावर पोहोचले. गडावरून परतताना दस्तुरखुद्द राजांनीच या किल्ल्याचे नामांतर ‘विश्रामगड’ असे केले. परंतु याला पट्टा (किल्ला) का म्हणतात त्याचा मात्र उलगडा होत नाही. त्याचे तसे उल्लेख कुठे सापडत नाहीत. बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य काही काळ या गडावर होते.
सह्याद्रीच्या या पुण्यभूमीला वंदन करायला, गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळायला आणि त्यावरचा इतिहास वाचायला आतुरलेले अनेक दुर्गभटके इथल्या रानवाटा तुडवत बाराही महिने फिरत असतात. पहाटेच गावातून अत्यंत मळलेल्या वाटेने आम्ही पंधरा मिनिटांतच एका गुहेसमोर पोहोचलो. ही गुहा म्हणजे लक्ष्मणगिरी महाराजांचे समाधीस्थान आहे.
महाराजांच्या दर्शनासाठी येथील पंचक्रोशीतील अनेक भक्तांचा राबता असतो. पौर्णिमेच्या दिवशीच या गुहेचं दार उघडत असल्याने या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळेच या परिसरातील भक्तमंडळी पट्टागडाला ‘लक्ष्मणगिरी महाराजांचा डोंगर’ म्हणून देखील ओळखतात. आम्हीही पौर्णिमेच्या दिवशीच आलो असल्याने येथे माथा टेकवूनच पुढे निघालो असता काही पाय-या पार करून दुसरी गुहा व त्याच्या शेजारीच गडाची अधिष्ठात्री पट्टाईदेवी समोर! देवीच्या नावामुळेच या गडाचे नाव पट्टागड पडले असावे, असं वाटतं.
तीन कमानीची अतिशय सुंदर व सुस्थितीत गडावर असलेली एकमेव वास्तू अंबारखाना. ‘बारा टाकी’ म्हणून प्रसिद्ध असलेली व एका रांगेत असलेली ही पाण्याच्या टाक्यांची माळ मात्र थांबून पाहावी अशीच आहे. विरंगुळयाची ‘अनमोल’ शिदोरी पाठीशी बांधून देणारा हा पट्टागड एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...